top of page

पालखी सोहळ्यात स्थानिक प्रशासनाची भूमिका


पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र, भावनिक आणि श्रद्धेचा उत्सव असून, हजारो वारकरी भक्तिभावाने पायी चालत पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. या यात्रेदरम्यान वारकऱ्यांची सुरक्षा, आरोग्य, आणि प्रवासातील सुविधा ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर असते. वारकऱ्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी रस्त्यावरील काटेरी झाडे हटवणे, खड्डे भरून रस्त्यांची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याची व वैद्यकीय सुविधा पुरवणे, स्वच्छतागृहे उभारणे व वाहतूक सुरळीत ठेवणे अशा सर्व बाबींची योग्य व्यवस्थापन करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. वारकऱ्यांचा प्रवास सुलभ, सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी प्रशासनाने समर्पितपणे आणि सजगतेने काम करणे आवश्यक आहे.

कार्यप्रसंगी ग्रामपंचायतीचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ग्रामपंचायत अधिकारी बहिर साहेब, मा. उपसरपंच मदन गोलेकर, मा. उपसरपंच श्रीकांत लोखंडे तसेच ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे यांची उपस्थिती होती.

ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree
ree

Comments


bottom of page